- मास्क न वापरणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्या 30 वाहन चालकावर केली कारवाई
राजुरा -
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तरीही अनेक नागरिक या सूचनांचं पालन करताना दिसत नाही. कडक निर्बंध लागू असतांना सुद्धा लोक मास्कविना आणि विनाकारण फिरत आहे. दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा धोका वाढत असताना काही नागरिक या आदेशाकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांचे मार्गदर्शनात विना मास्क, विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्या वाहन चालक व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दि. १६ ला झालेल्या कार्यवाहीत 38 वाहन चालकावर कारवाई करीत 6 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर आज दि. १५ ला झालेल्या कार्यवाहीत 30 वाहन चालकांवर कारवाई करीत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मास्कविना, अतिमहत्वाच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर निघू नये असे शहरातून पोलीस ध्वनीक्षेपा द्वारे लोकांना माहिती देत आहेत. कारवाई शहरातील मुख्य चौकात केली जात आहे. या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक झुरमुरे, सहायक पोलिस निरीक्षक दरेकर, अरुण कुकुडकर, राधेश्याम यादव, उमेश रामटेके, प्रशांत येडे, संपत बंडी आदी पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड कर्मचाऱ्यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.