- चक्री वादळामुळे तालुक्यातील अनेक घरांची व फळबागांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान
- प्रशासनाने तात्काळ पाहणी व पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी
सावली -
काल झालेल्या अवकाळी पाऊस व चक्री वादळामुळे सावली तालुक्यातील कवठी, पारडी, रुद्रापूर, सिंगापूर, उसेगाव, जिबगाव इ. अनेक गावांना याचा चांगलाच तडाखा बसला. जोराच्या चक्री वादळामुळे अनेक गावातील घरांच्या भिंती, कवेलू, टिन पत्रे, कोसळल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. तसेच आंबा, चिंच, पेरू, चिकू इत्यादी फळ बागाचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याने प्रशासनाने पाहणी वं पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी सावली तालुक्यातील नागरिकांनी केलेली आहे.
वादळामुळे बऱ्याच गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू होता. उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा जाणवत होता. दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली. ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता अशी माहिती आमचा विदर्भच्या कार्यालयाला फोन करून नागरिकांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.