- चंद्रपूर जिल्ह्यात 21 एप्रिल पासून ‘जनता कर्फ्यू'
- अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्याचे आवाहन
सर्व किराणा दुकान, भाजीपाला व फळे, सर्व प्रकारच्या व्यापारी आस्थापना/दुकाने उपरोक्त कालावधीत बंद - काय राहणार सुरु, काय बंद वाचा सविस्तर.....
1. दिनांक 21 एप्रिल, 2021 ते दिनांक 25 एप्रिल, 2021 व दिनांक 28 एप्रिल 2021 दिनांक 01 मे, 2021 या कालावधीत खालील सेवा नियमितपणे सुरु राहतील : अ) सर्व दवाखाने व औषधी दुकाने, कृषी केंद्र व पशु खाद्य दुकाने, सर्व शासकीय कार्यालय, बँक,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत औद्योगिक आस्थापना कार्यालयीन दिवशी), ब) घरपोच सेवासह दूध वितरण, वर्तमान पत्र, एल.पी.जी. गॅस वितरण, पेट्रोल पंप व हॉटेल मधुन Delivery Boy व्दारे घरपोच सेवा सुरु राहील.
क) परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी व त्यांचेसोबत त्यांचे पालक यांना परवानगी राहील. सोबत प्रवेशपत्र बाळगावे.
2. दिनांक 21 एप्रिल, 2021 ते दिनांक 25 एप्रिल 2021 व दिनांक 28 एप्रिल, 2021 ते दिनांक 01 मे, 2021 या कालावधीत वरीलप्रमाणे सेवा सुरु राहतील. त्या व्यतिरिक्त सर्व किराणा दुकान, भाजीपाला व फळे, सर्व प्रकारच्या व्यापारी आस्थापना/दुकाने उपरोक्त कालावधीत बंद राहतील.
उपरोक्त कालावधीत वरील क्रमांक मधील सुविधा सोडून चंद्रपूर जिल्हयातील सर्व पानठेला/चहा टपरी व हातगाडी, फुटपाथ वरील चायनीजसह इतर सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना बंद राहतील. वरीलप्रमाणे कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी सर्व नागरीक / लोक प्रतिनीधी व इतर सर्व दुकानदार यांनी स्वयंघोषीत जनता कर्फ्यू पाळून नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Kirana bhaji pala medikal other jivnavshk chaloo pahije
उत्तर द्याहटवा