- तनसचा ढीग व शेतीचे अवजारे जळून खाक
राजुरा -
राजुरा तालुक्यातील तुलाना या गावातील मारोती टेकाम यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत खांबाचा जिंवत विद्युत तारा तुटून शेतात असलेल्या तनसीच्या ढिगावर पडल्याने तनिस व शेतीचे अवजारे जळून खाक झाली.
आधिच शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला असून महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकर्याने वर्षभरासाठी गुंराच्या पोटापाण्यासाठी जमा केलेला चारा जळून खाक झाल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. तरी तहसीलदार साहेब तसेच महावितरण कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता मदत करावी व दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.





टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.