Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा खेळखंडोबा केला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपुरात काँग्रेसची व्हर्चुअल रॅली मान्यवरांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन रमेश निषाद - प्रतिनिधी बल्लारपूर - मागील सहा वर्षापासून केंद्र सरका...

  • बल्लारपुरात काँग्रेसची व्हर्चुअल रॅली
  • मान्यवरांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
रमेश निषाद - प्रतिनिधी
बल्लारपूर -
मागील सहा वर्षापासून केंद्र सरकारने बळीराजांची दिशाभूल केली आहे. अशातच अलीकडे शेतकरी विरोधी तीन विधेयकांचे कायद्यात रूपांतर करून शेतकरी व कामगारांना देशाेधडीला लावण्याचे पातक केले आहे. परिणामी देशभरात केंद्र सरकार विरोधात नवा संघर्ष निर्माण झाला आहे. कायद्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून केंद्र सरकारने बळीराजांच्या खेळखंडोबा चालविला आहे, असा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बल्लारपूर येथील महात्मा गांधी भवन समाेरील प्रांगणात आयोजित शेतकरी विरोधी व्हर्च्युअल रॅली दरम्यान केला. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्य भर शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात व्हर्च्युअल रॅली आयोजित केली जात आहे. या मालिकेत बल्लारपूर येथे व्हर्च्युअल रॅली घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना मान्यवर बाेलत होते. 

यावेळी तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी म्हणाले, केंद्र सरकार शेतकरी व कामगार विरोधी भूमिका घेत आहे. लाेकशाही प्रक्रिया पायदळी तुडवून हुकूमशाही लादत आहे. शेतकरी विरोधी काळा कायदा लागू करून पिळवणूक करत आहे. नव्या शेतकरी विरोधी कायद्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था धुळीला मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. भारताच्या अन्नदात्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यासाठी आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे, असे घनश्याम मुलचंदानी यांनी सांगितले. 

बल्लारपूर येथील शेतकरी विरोधी कायदा व्हर्च्युअल रॅलीत काँग्रेसचे नेते घनश्याम मुलचंदानी, माजी नगराध्यक्ष डॉ मधुकर बावणे, महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्ष एड. मेघा भाले, अफसाना सय्यद, छाया शेंडे, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, अनिल खरतड, प्राणेश अमराज, माजी नप गट नेते देवेंद्र आर्य, इस्माईल ढाकवाला, डॉ युवराज भसारकर यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती हाेती.  


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top