Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भंडारा, वर्धा, रामटेक मेट्रो ने जोडली जाणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागपूरच्या जवळच्या शहरांना पॅसेंजर ट्रेनऐवजी वातानुकूलित मेट्रोने जोडण्याच्या प्रकल्प राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी दिली मंजुरी नागपूरपासून जव...

  • नागपूरच्या जवळच्या शहरांना पॅसेंजर ट्रेनऐवजी वातानुकूलित मेट्रोने जोडण्याच्या प्रकल्प
  • राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी दिली मंजुरी
  • नागपूरपासून जवळ असलेल्या नरखेडसह भंडारा, वर्धा व रामटेक ही शहरेसुद्धा आता मेट्रोने जोडली जाणार
आयशा - प्रतिनिधी
नागपूर -

नागपूरच्या जवळच्या शहरांना पॅसेंजर ट्रेनऐवजी वातानुकूलित मेट्रोने जोडण्याच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. नागपूरपासून जवळ असलेल्या नरखेडसह भंडारा, वर्धा व रामटेक ही शहरेसुद्धा आता मेट्रोने जोडली जाणार आहेत. यात नागपूर ते नरखेड या ८५.५३ किलोमीटर मार्गाचा समावेश आहे.

या शहरांदरम्यान ११ स्थानके राहणार आहेत. नागपूर शहरातून होणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्यासंदर्भात २०१८मध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला होता. परंतु, या करारात अनेक त्रुटी होत्या. या प्रकल्पाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची रीतसर मंजुरी मिळाल्याने या प्रकल्पात असलेल्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. यातील पहिला टप्पा २०२१ ते २०३१ या काळात पूर्ण होईल. तर दुसरा टप्पा २०३१नंतर सुरू होईल. यात नागपूर ते नरखेड हा ८५.५३ कि.मी., नागपूर-वर्धा ७८.८ कि.मी., नागपूर-रामटेक ४१.६ व नागपूर-भंडारा रोड हा ६२.७ किलोमीटर रेल्वेमार्गाचा समावेश राहणार आहे. नागपूरच्या जवळच्या शहरातून येजा करणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याचा विश्वास महामेट्रोने व्यक्त केला.

'केएफडब्ल्यू' कडून कर्जाची व्यवस्था
महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार महामेट्रोचे भागभांडवल या प्रकल्पामध्ये राहील. यासाठी केएफडब्ल्यू या संस्थेकडून कर्ज घेण्याची जबाबदारी व त्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी महामेट्रोवर टाकण्यात आलेली आहे. नरखेड, वर्धा, रामटेक व भंडारा या शहरातून येणारे व जाणारे अनेक प्रवासी असतात. याचा फायदा नागपूर शहरातील मेट्रोची प्रवासीसंख्या वाढण्यासाठी सुद्धा होणार आहे.

विकासाला मिळेल चालना
महामेट्रो प्रकल्पाला नरखेड जोडले जाणार असल्याने नरखेड व काटोल या परिसरातील विकासाला चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रोशी काही शहरे जोडावीत, अशी मागणी केली जात होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा केला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे या प्रयत्नांना यश आले आहे. विकासाची नवी दिशा या प्रकल्पामुळे या परिसराला मिळणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top