Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर-नांदा (फाटा) रस्ता खड्यांच्या विळख्यात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दिवसेंदिवस अवजड वाहनांच्या संख्येत वाढ संबधित विभागाचे दुर्लक्ष : नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास सुरज लेडांगे - प्रतिनिधी गडच...

  • दिवसेंदिवस अवजड वाहनांच्या संख्येत वाढ
  • संबधित विभागाचे दुर्लक्ष : नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास
सुरज लेडांगे - प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरात मोठमोठे सिमेंट कारखाने असून वाहनांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. गडचांदूर-नांदा (फाटा) या रस्त्यावरून अवजड वाहने ये-जा करीत असल्याने रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्याने आवागमन करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गडचांदूर-बिबी-नांदा (फाटा) या परिसरात अल्ट्राटेक सिमेंट कंपनी असल्याने रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढली असून रात्रंदिवस सुरु असलेल्या अवजड वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून बिबी गावालगत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीने लगतच्या घरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनचालकांचे अपघात झाले आहे तर अनेकांच्या वाहनांचे नुकसान होत आहे. परिसरातील नागरीक या रस्त्यावर सकाळी फिरायला जातात, शेतकरी शेतांत जातात, यामुळे सदर मार्गावर अपघाताची भीती वाढली असून या रस्त्याने आवागमन करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे संबंधीत विभागाने रस्ता दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top