- भद्रावती येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे तहसीलदारांना निवेदन
भद्रावती -
राज्यात ५२ टक्के असलेला ओबीसी समाजाचा मागण्या व न्याय हक्कासाठी स्वातंत्र्यप्राप्ती नंतर अनेक वर्षे होऊन अद्यापही पूर्ण करण्यात आल्या नाहीत. हा या समाजावर झालेला अन्याय असून राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे करण्यात आलेल्या समाजाचा संविधानिक न्याय मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या भद्रावती शाखे तर्फे तहिसलदार महेश शिंतोडे यांना निवेदन सादर करण्यात आले असून निवेदनासोबत मागण्याची प्रत सुद्धा देण्यात आली. ५२ टक्के इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काप्रमाणे अद्यापही सोयी सवलती मिळत नाही हि या समाजावर अन्यायकारक बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करणे, ओबीसीच्या रिक्त जागाचा अनुशेष त्वरित भरणे, ओबीसी समाजासाठी घरकुल योजना सुरु करणे, ओबीसी कर्मचाऱ्यांचा पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करणे आदी विविध मागण्या या निवेदनातून सादर करण्यात आल्या. शिष्टमंडळात ओबीसी महासंघाचे पांडुरंग टोंगे, प्रफुल चटकी, अजय जीवतोडे, संदीप गोखरे, सुनील आवारी, नितीन खरवडे, स्वप्नील मोहितकार, राकेश खुसपुरे, उमेश काकडे, हेमंत आवारी, अभय खिरटकर, धनराज आस्वले, चंदू खारकर तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.