Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आता विहिरगाव येथे उघड्यावर शौचास बसल्यास होणार पोलीस कार्यवाही - प्रशासक अमित महाजनवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गावात आता एकही बालक कुपोषित राहणार नाही शेवगा व इतर पौष्टिक आहार देणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्याचा निर्णय माजी उपसरपंच इरशाद शेख, सघन शेतकर...

  • गावात आता एकही बालक कुपोषित राहणार नाही
  • शेवगा व इतर पौष्टिक आहार देणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्याचा निर्णय
  • माजी उपसरपंच इरशाद शेख, सघन शेतकरी व प्रतिष्ठित नागरिक बृहस्पती साळवे यांची प्रमुख उपस्थिती
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. गावातील ज्या कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा नाही अशा कुटुंबांना शौचालयाची वैयक्तिक अथवा सामुदायिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. गाव हागणदारीमुक्त करणे आणि घनकचरा व्यवस्थापन करून गाव स्वच्छ करणे या दोन टप्यात हे अभियान राबविण्यात येते. घनकचरा व्यवस्थापन कायद्यातंर्गत आता विहिरगाव येथे उघड्यावर शौचास बसल्यास पोलीस कार्यवाही होणार असल्याचे प्रशासक अमित महाजनवार यांनी सांगितले. 

विहिरगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक सूर्यवंशी, माजी उपसरपंच इरशाद शेख, सघन शेतकरी व प्रतिष्ठित नागरिक बृहस्पती साळवे, रोजगार सेवक होरे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

महाजनवार यांनी सांगितले कि, ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सकस आहार साठी शासनाकडून ग्रामपंचायत ला प्राप्त 2 एकर जमीन स्वच्छ करण्याची सुरुवात व त्या नंतर या जमिनीवर शेवगा व इतर पौष्टिक आहार देणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून भविष्यात या आहाराचा उपयोग गावातील लहान बालकांना व गरोदर मातांना होईल व गाव कुपोषण मुक्त राहण्यासाठी मदत होईल. 

माझे कुटुंब माझी जवाबदारी या कार्यक्रमात विहिरगाव वासीयांनी सहभाग घेऊन कोविड 19 पासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा तसेच सामाजिक अंतर राखावे, मास्क चा नियमित वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी मास्क चा वापर न केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, थकीत व नियमित गृहकर व पाणी कर भरून ग्रामपंचायत ला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. शौचालायचा नियमित वापर करावा, उघडयावर शौचास जाणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, स्वच्छतेचे सर्व नियम पाळावे. जनतेच्या सहकार्याने विहिरगावला गांधीजींच्या स्वप्नातील गाव बनविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महाजनवर यांनी सांगितले. याप्रसंगी माजी उपसरपंच इर्शाद शेख, बृहस्पती साळवे यांनी सर्वपतोरी सहकार्य करण्याचे आश्वासन महाजनवार यांना या प्रसंगी दिले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top