- कापुस, सोयाबीन, धान, तुरी पिकांचे नुकसान
- पिकांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या - आ. सुभाषभाऊ धोटे
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
शनिवार १० ऑकटोबर रोजी मान्सूनच्या परतीच्या पावसाने राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी, कोरपना व जिवती तालुक्यात जोरदार हजेरी लावली. राजुरा तालुक्यातील मंगी, वरुर, टेंबरवाही, तुलाना, बेरडी, चिचबोडी शिवारात कापुस, सोयाबीन, धान, तुरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
रात्री तुफान, वारा, पाऊस आल्याने मंगी शिवारात ही कापुस, सोया, धान, तुरी चे पिकाची भयानक नुकसान झाले आहे. पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्यातर्फे माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. तर तहसील प्रशासनाने संबंधित यंत्रणेला त्वरित पंचनामे करण्या बाबत सूचना दिल्या आहेत.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.