- राजुरा वनपरिक्षेत्र खांबाळा गावातील दुसरी व परिसरातील दहावा बळी
- जनतेचा आक्रोश
- वन कर्मचारी चिंतेत
- दहा दिवसापूर्वी नवेगाव येथील वृद्ध शेतकऱ्याला झाला होता मृत्यू
सविस्तर वृत्त असे की, मारोती पेंदोर याचे खांबाडा गावाला लागून शेत आहे. तो काल दुपारी जवळच असलेल्या कंपार्टमेंट 178 मधील घटना जंगलाशेजारच्या भागात तो पाळीव जनावरांना चरण्यासाठी गेला होता. परंतु घरी परत आला नसल्याने आज सकाळपासून शोध घेतला असता जंगलात वाघाचे हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
त्यातल्यात्यात वाघाने मारल्यानंतर त्याच्या शरीराचा जवळपास 60% भाग खाल्याचे समजते ह्यावरून असे दिसते की हा वाघ आता माणसाच्या रक्ताला चटावला नसुन मानवाचे मांस सुद्धा आता ह्याला आवडू लागले आहे. विशेष म्हणजे वाघ हा माणसाला ठार करतो परंतु मांस खात नसल्याचे आढळून आले होते. त्याचप्रमाणे वाघ शिकार केल्यानंतर आधी केवळ रक्त पितो आणि शक्यतो दुसर्या दिवशी मांस भक्षण करतो मात्र ही घटना अपवाद असल्याचे सिद्ध होत आहे.
घटनेची माहिती होता वन कर्मचारी घटना स्थळी पोहचले असुन पंचनामा करून त्यांनी शव उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे पाठवले असल्याचे कळले आहे.
ह्या घटनेने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे ऐन शेतीच्या महत्वाच्या हंगामात अशा घटना घडत असल्याने त्यांची चिंता वाढली असुन वनविभागाने ह्या नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा अन्यथा शेतकर्यांना कुंपणाला विद्युत करंट लाऊन आपला बचाव करावा लागेल अशी भावना व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.