Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 'त्या' नरभक्षक वाघाचा बंदोबस्त न केल्यास रास्तारोको आंदोलनाचा इशारा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
file photo अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा वनपरिक्षेत्र, राजुरा व विरूर (स्टे.) अंतर्गातील गावांमध्ये नरभक्षक वाघाने धुमाकुळ ...

file photo

अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -

राजुरा वनपरिक्षेत्र, राजुरा व विरूर (स्टे.) अंतर्गातील गावांमध्ये नरभक्षक वाघाने धुमाकुळ घातला असून मागील वर्षाभरात १० शेतकऱ्यांना नाहक प्राण गमवावा लागला. या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी, शेतमजूर समन्वय समितीने वन प्रशासनाला दिला आहे.

उपविभागीय वनअधिकारी यांना निवेदन देऊन हा इशारा देण्यात आला असून यावेळी समितीचे सदस्य चेतन जयपूरकर, मल्लेश आत्राम, भाग्यश्री आत्राम, निलेश राऊत, सुभाष साळवे, चारणदास तोडासे, शंकर धनवलकर आदी उपस्थित होते. 

टेंबूरवाही, सिर्सी, खांबाळा, तुलाना, नवेगांव. सोनुली, केळझर, चिंचोली, कविठपेठ, धानोरा, सिंधी, नलफडी व विहीरगाव भागातील शेतकऱ्यांना शेतात जाणे व शेतीचे काम करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. परिसरात १६ जानेवारी, २०१९ पासून आजपर्यंत २२ महिण्याच्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले असून अनेक शेतकरी वाघाच्या हल्यात गंभीर जखमी झाले. काही शेतकऱ्यांना तर कायमचे दिव्यांगत्व आले आहे. वाघाच्या भितीने अन्य वन्य प्राण्यांचा गावालगतच्या शेतात संचार वाढला असल्याने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होत असून शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. 

यामुळे वन विभागानी नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा शेतकन्यांकडून वन विभागाच्या कार्यालयासमोरील मुख्य मार्गावर दिनांक १२ ऑक्टोंबर ला लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून करण्यात आला आहे 












About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top