Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: करोनाचा वाढता धोका; राजूरात १६ ते २० सप्टेंबर जनता कर्फ्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पाच दिवसाचा जनता कर्फ्यू वाचा - काय राहणार सुरू.... काय राहणार बंद... राजुरा - कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरात १६ ते २० सप्टे...

  • पाच दिवसाचा जनता कर्फ्यू
  • वाचा - काय राहणार सुरू.... काय राहणार बंद...
राजुरा -
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरात १६ ते २० सप्टेंबर पर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लावण्याचा आज निर्णय घेण्यात आला. तहसील कार्यालय येथे झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी खाडे साहेब, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसूरकर, नगर सेवक आनंद दासरी, हरजीत सिंह, सतीश धोटे, अजय बतकमवार, सचिन शेंडे, व्यापारी एसोसिएशन चे उपाध्यक्ष जितेंद्र देशकर, राजू बंदाली, रेकलवार तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तहसील कर्मचारी, नप कर्मचारी उपस्थित होते. 

गेल्या काही दिवसां पासून राजुरा शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता पादुर्भाव बघता जनता कर्फ्यू लावण्याची मागणी व्यापारी करीत होते. त्यात आज सर्वसंमत्ती ने १६ ते २० सप्टेंबर असा ५ दिवसाचा स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लावण्याचा आज निर्णय घेण्यात आला. या जनता कर्फ्यू मध्ये दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, पेट्रोल पम्प, न्यूज पेपर वितरण, बँका, शासकीय, निम शासकीय कार्यालये नियमित सुरु राहणार असून, कृषि केंद्र सकाळी ९ ते २, दूध विक्री करिता सकाळी ७ ते ९ दोन तासा करिता सुरु राहणार असून किराणा, भाजी विक्री, फळ विक्री सोबतच सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील असा निर्णय घेण्यात आला. तहसील प्रशासनाना सोबतच व्यापारी एसोसिएशन ने जनता कर्फ्यू ला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top