Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विदर्भवादी करणार नागपूर कराराची होळी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विदर्भ राज्य आंदोलन समिती २८ सप्टेंबर रोजी करणार विदर्भात सर्वत्र नागपूर कराराची होळी वेगळ्या विदर्भासाठी एक शतकाहून अधिक काळापासून आंदोलन स...

  • विदर्भ राज्य आंदोलन समिती २८ सप्टेंबर रोजी करणार विदर्भात सर्वत्र नागपूर कराराची होळी
  • वेगळ्या विदर्भासाठी एक शतकाहून अधिक काळापासून आंदोलन सुरू
  • विदर्भवादी एकवटले
आयशा - प्रतिनिधी
नागपूर -
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने येत्या २८ सप्टेंबर रोजी विदर्भात सर्वत्र नागपूर कराराची होळी करण्यात येणार आहे. वेगळ्या राज्यासाठी एक शतकाहून अधिक काळापासून आंदोलन सुरू असले तरी, अद्याप यश आलेले नाही. तत्कालीन राज्यकर्त्यांनी २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार केला. 

त्यानंतर १ मे १९६० रोजी विदर्भासह महाराष्ट्राची निर्मिती झाली. करारातील अकरापैकी एकाही कलमाचे पालन झालेले नाही. उलट विदर्भाचे शोषण करण्यात येत आहे. त्यामुळे २८ तारखेला गावोगावी नागपूर कराराची होळी करण्यात येणार असल्याचे समितीने जाहीर केले.

विदर्भाला लोकसंख्येच्या प्रमाणात २३ टक्के नोकऱ्या नाहीत, उच्चपदाच्या नोकऱ्याही नाहीत, चार लाख नोकऱ्या अन्य भागात गेल्या. विदर्भाला २३ टक्के निधीही दिला नाही, ७५ हजार कोटी रुपये सिंचनाचे आणि ५० हजार कोटी रुपये रस्त्याचे अन्य भागात पळवले. गोसेखुर्दसारखी १३१ धरणे तीन दशकांत पूर्ण झाली नाही. विदर्भातील तरुणांचा रोजगारांचा प्रश्न, सिंचन आणि विकासाचे प्रश्न कायम आहेत. या सर्व प्रश्नांना वेगळे राज्य हेच एकमेव उत्तर असल्याचे समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी म्हटले आहे.

आंदोलनात विदर्भवाद्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार एड. वामनराव चटप, रंजना मामर्डे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, मुकेश मासुरकर, विष्णू आष्टीकर, अरुण केदार, धनंजय धार्मिक, सुयोग निलदावार, सरोज काशीकर, एड, मोरेश्वर टेमुर्डे, सुनील वडस्कर, जी.एस. ख्वाजा, राजेंद्र आगरकर, दिलीप भोयर, धर्मराज रेवतकर आदींनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top