- लॉकडाऊनमुळे नोकरी गेली
- आता मोलमजुरी करून दररोज कमावतात 200 रुपये
सन २०१८ मध्ये साहित्य विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ कादंबरीला मिळाला होता. जीवनातील कटुसत्यावर भाष्य करणारी कादंबरी अशा शब्दांत अनेक साहित्यिकांनी त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. गोरे यांची ही कादंबरी प्रचंड गाजली. घरात अठराविश्वे दारिद्य्र असलेल्या नवनाथ यांचे या कादंबरीने आयुष्य बदलले.
कादंबरीच्या यशानंतर त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या गावी पद्मभूषण विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयात तासिका तत्त्वावर सहयोगी प्राध्यापकाची नोकरी लागली. दरमहा १० हजार रुपये वेतन त्यांना मिळत होते. आयुष्याचा गाडा रुळावर आला. हा आनंद फार काळ टिकला नाही. परंतु अवघ्या सहा महिन्यांनंतर कोराेना आला, पाठोपाठ लॉकडाऊन लादले गेले. त्यांना नोकरी गमवावी लागली. त्यानंतरच्या ‘लॉकडाऊन’च्या सहा महिन्यांच्या काळात आपले कुटुंब चालवण्यासाठी त्यांच्यावर मोलमजुरी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सध्या दिवसाला आठ ते दहा तास राबून अवघ्या २०० रुपयांवर त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे.
कलावंतांप्रमाणे लेखकांनाही मानधन द्या : गोरेसांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात निगडी बुद्रुक या गावातील नवनाथ यांनी मोठ्या कष्टाने एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. घरात वृद्ध आई, मोठा अपंग भाऊ व शिक्षण घेणाऱ्या लहान भावांचे कुटुंब आहे. सरकारने कलावंतांप्रमाणेच लेखकांनाही मानधन द्यावे, अशी मागणी नवनाथ गोरे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.