- मराठा संघटनांच्या अथक आंदोलन, मूक मोर्चानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला, त्यानंतर उच्च न्यायालयातही हे आरक्षण टिकवण्यात फडणवीस सरकारला यश आले. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थिगिती दिल्याच्या निर्णयाने राज्यातील मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत दिसतो आहे.
मराठा संघटनांच्या अथक आंदोलन, मूक मोर्चानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला, त्यानंतर उच्च न्यायालयातही हे आरक्षण टिकवण्यात फडणवीस सरकारला यश आले. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थिगिती दिल्याच्या निर्णयाने राज्यातील मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत दिसतो आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार मुंख्यमंत्र्यांच्या पाठिशी असातानाही, या मुद्याचे राजकारण राज्यात होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सर्व मराठा संघटनांना शांततेचे आवाहन करुनही, राज्यातील दररोजच्या आंदोलनांची संख्या पाहता, हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यातच छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले हे सरकारविरोधी करत असलेल्या वक्तव्यांनी सरकार अधिक अडचणीत येताना दिसते आहे. सर्वपक्षीयांना विश्वासात घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी सरकारला पाठिंबा जाहीर केला असला, तरी या मुद्याचे राजकारण करण्याची संधी विरोधक सोडणार नाहीत हे नक्की.











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.