Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: त्या सिंचन प्रकल्प स्थानी माहिती फलकाचा अभाव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
फलक लावण्याची गरज सिंचन प्रकल्प स्थानी माहिती फलकाचा अभाव शैलेश कोरांगे - प्रतिनिधी  कोरपना - तालुक्यातील मध्यम धरण प्रकल्प असलेला पकडीगुड्ड...

  • फलक लावण्याची गरज
सिंचन प्रकल्प स्थानी माहिती फलकाचा अभाव
शैलेश कोरांगे - प्रतिनिधी 
कोरपना -
तालुक्यातील मध्यम धरण प्रकल्प असलेला पकडीगुड्डम व अमलनाला धरण प्रकल्प स्थानी प्रकल्प संदर्भात माहिती फलकच नसल्याने पर्यटक व नवीन येणारे नागरिक यांना  माहितीच मिळत नाही. त्यामुळे त्यांचा हिरमोड होताना दिसतो आहे. 
पकडीगुड्डम प्रकल्पाचा लोणी कडे जाणारा दुसरा क्रमांक चा कालवा बुजला

मलनाला प्रकल्प १९८५ साली बांधून तयार झाला. तर कोरपना तालुक्यातील पकडीगुडम प्रकल्प १९९२ ला पूर्णत्वास आला. तेव्हापासून हा प्रकल्प शेती सिंचन व उद्योगासाठी वरदान ठरत आहे. मात्र या प्रकल्पाकडे संबंधित अधिकार्‍याचे पाहिजे तसे लक्ष होत नसल्याने प्रकल्प दुरावस्थे कडे वाटचाल करित आहे. आज घडीला प्रकल्प स्थानी कुठलाही माहिती फलक नसण्याबरोबरच सुरक्षारक्षकही या स्थळी तनात नाही. त्यामुळे प्रकल्प सुरक्षा राम भरोसे पडली आहे. दोन्ही प्रकल्पाचे कालवे ही अस्वच्छतेने बरबटलेले आहे. पकडी गुड्म प्रकल्पाचा लोणी कडे जाणारा दुसरा क्रमांक चा कालवा ही बुजला गेला असल्याने शेतकऱ्याच्या बांधावर कधीच पाणी पोहोचत नाही. त्यामुळे सिंचन तर दूर थेब भर पाणी ही त्या कालव्याने कधी पाहायला मिळत नाही. या दोन्ही प्रकल्पाचे कार्यालय एकाच स्थळी दोन वेग वेगळ्या ठिकाणी आहे. मात्र येथे अनेक कर्मचाऱ्यांची पदे वर्षानुवर्षांपासून रिक्त आहे. तसेच दोन्ही प्रकल्पाचा भार एकाच अभियंत्याच्या भरोशावर सुरू आहे. या प्रकल्पाच्या विकासाच्या दृष्टीने अद्यापही कुठलीच प्रक्रिया करण्यात आली नाही.त्यामुळे येथील भौतिक विकासही थांबला गेला आहे. त्यामुळे या प्रकल्पांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

(या ठिकाणी अल्प दरात जाहिराती करिता संपर्क करा.)


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top