Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना नगर पंचायतची आरोग्य यंत्रणा बिमार तर नाही ना...!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - प्रतिनिधी कोरपना - संपूर्ण देशात कोरोना या महाभयंकर विषाणूने थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे, परन्तु ...

शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -
संपूर्ण देशात कोरोना या महाभयंकर विषाणूने थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे, परन्तु गावपातळीवर या विषाणूने थैमान घालू नये या करिता आमच्या नगर पंचायतची काहीच जवाबदारी नाही का? सहा महिन्यांचा कालावधी लोटला परन्तु अजूनही साधी कीटकनाशक फवारणी केली नाही, कोरपना शहरात संपूर्ण प्रभागात घाणीचे साम्राज्य असताना त्याकळे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून घनकचरा व्यवस्थापना चे काम करणाऱ्या ठेकेदाराला आयता पैसा दिला जात आहे.

परन्तु स्वच्छता कुठेही दिसत नाही, सांडपाण्याच्या नाली सफाई करून त्या वरती कीटक नाशक फवारणी करावी जनेकरून डेंगू, चिकन गुणीया या आजारांनी डोके वरती काठू नये या करिता आरोग्य विभागणी खबरदारी घेणे नगर पंचायतची जवाबदारी नाही, फक्त माक्स लावून नसल्याना दंड ठोकायचा फक्त एवेळीच जवाबदारी नगर पंचायतची आहे का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहे. 

सध्याच्या परीस्थितीत स्वच्छते कडे लक्ष देणे गरजेचे आहे, परन्तु अनेकदा तक्रारी देऊन सुद्धा नगर पंचायतला काही देणे घेणे नाही, कोरोना बाधितांची  संख्या झपाट्याने वाढत आहे व शहरात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला आहे, या खबरदारी म्हणून नगर पंचायतच्या आरोग्य विभागानी, शहरातील स्वच्छता, जंतनाशक फवारणी व डेंगू मलेरिया, चिकन गुणिया या वरती कोणती काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात जनजागृती करणे गरजेचे होते. परन्तु आरोग्य  विभागाच्या माध्यमातून कोणतीच खबरदारी घेत नसल्याने आरोग्य विभागच बिमार तर नाही ना असा सवाल कोरपना येथील नागरिक करीत आहे. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top