- आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केला जनता कर्फ्यू ला विरोध
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असा ७ दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याच्या निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन इमारतीत आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे. यापूर्वी चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, भद्रावती, गडचांदूर मध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. जनता कर्फ्यू लावण्यामागचा मुख्य उद्देश कोरोना साखळी खंडित करणे हा त्याचा मुख्य हेतू होता. परंतु जनता कर्फ्यू दरम्यान ११९६ कोरोना बाधित आढळले. कर्फ्यू दरम्यान, एकाच दिवसात सर्वाधीक ४०१ कोरोना बाधितांची सुद्धा नोंद झाली होती. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार यांच्यासमवेत जिल्हा कार्यालयात सर्वपक्षीय प्रतिनिधी, व्यापार मंडळाचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असा ७ दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याच्या निर्णय घेण्यात आला. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी जनता कर्फ्यू चा विरोध केला असून उर्वरित सर्वपक्षीय प्रतिनिधींनी जनता कर्फ्यू ला पाठिंबा दर्शविला, २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असा ७ दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याच्या निर्णय घेण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.