- मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
राजुरा -
महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक, आणि शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली आहे. त्यावर आधारित शिक्षण आणि नौकरी मध्ये १० टक्के आरक्षण द्या या मागणीचे निवेदन राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदारां साहेबानं मार्फत देण्यात आले.
महाराष्ट्रात मुस्लिम समाज सर्व स्तरावर अतिशय मागास झाला आहे, सच्चर समिती मोहम्मदूर रहमान समिती, आणि रंगनाथ मिश्रा आयोग यांनी सखोल अभ्यास, चौकशी करून आपल्या अहवालात ही बाब सादर केलेली आहे व दहा टक्के आरक्षण मिळावे म्हणून स्पष्ट शिफारस देखील केलेली आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची कायदेशीर बाजू संविधानानुसार भक्कम आहे. मुस्लिम समाजा शैक्षणिक सामाजिक आर्थिक अति मागासलेपणावर आधारित आहे. जी संविधानिक आहे. या मागणीत कुठेही धमार्ची अडचण येत नाही.
यावेळी रा.काँ. चे शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, उपाध्यक्ष राजु ददगाळ, महासचिव नदीम महेमुद शेख, महासचिव अंकुश भोंगळे, संघटक सचिव संदीप पोगला, संघटक सचिव जुनेद शेख, ईमरान पटेल, वसिम शेख, सैय्यद शाहिद, अरबाज पठाण, सोहेल शेख, वसिम शेख व नावेश शेख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.