Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मोदी सरकार रोजगार दो - अशोक राव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची राजुरा शहर युवक काँग्रेसची मागणी शहर युवक काँग्रेसने मागणीचे निवेदन तहसीलदार साहेबांना दिले अनंता गोखरे - ...

  • बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची राजुरा शहर युवक काँग्रेसची मागणी
  • शहर युवक काँग्रेसने मागणीचे निवेदन तहसीलदार साहेबांना दिले
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
केंद्रातील मोदी सरकारमुळे देशात बेरोजगारीचा उच्चांक गाठला गेला असून, त्यामुळे बेरोजगार तरुण संतप्त आहेत. युवकांना रोजगार निर्मितीबाबत तातडीने कार्यवाही करण्यासंदर्भात केंद्र सरकार ने पावले उचलावीत,  अश्या मागणीचे निवेदन शहर युवक काँग्रेसने तहसीलदार साहेबांना दिले. 

केंद्रातील मोदी सरकार युवकांसाठी वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आले. पण परिस्थिती मात्र वेगळीच आहे. नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटा बसला. त्याची परिणीती म्हणजे करोडो रोजगार नष्ट झाले. वस्तू सेवा कराच्या कुटीर व लघु मध्यम क्षेत्राचे आणि उद्योग धंद्याचे पार कंबरडे मोडले असून याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्ठ्या प्रमाणात वाढण्यात झाला. पंतप्रधान मोदी यांच्या २० लाख करोडाच्या पैकेज मधून बेरोजगार युवक, शेतकरी व लघु, मध्यम उद्योग क्षेत्र यापैकी कोणत्याही घटकास मदत झाली नाही. मोदी सरकार रोजगार दो अशी मागणी युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष अशोक राव यांनी केली आहे. 

मोदींनी दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासनाला जाणून रोजगार निर्मितीवर लक्ष दिले पाहिजे. युवक हे निराश झाले आहेत, आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. केंद्र सरकारने रोजगार निर्मितीची स्वतःची जबाबदारी ढकलून चालणार नाही. तरुण हाताना काम हवे आहे. मोदी सरकारकडे आमची मागणी एकच आहे, रोजगार दो! या बाबतचे निवेदन तहसीलदार साहेबांना राजुरा युवक काँग्रेस कमिटी द्वारा देण्यात आले. 

काँग्रेस चे शहर अध्यक्ष अशोक राव, ग्राम पंचायत सदस्य जगदीश बुटले, सोनिया नगर वॉर्ड अध्यक्ष निरंजल मंडल, सय्यद शाहिद आदींनी निवेदन दिले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top