- राजुरा तालुक्यातील नवेगाव गावांतील महिन्यातील दुसरी घटना
- वाघाच्या हल्यात आता पर्यंत ६ लोक मृत्युमुखी
- वाचा सविस्तर....
तसेच नवेगाव लगत असलेल्या भेंडाला येथील वेटी या शेतकऱ्याची जनावर फस्त केल्याची घटना आज सकाळी घडली, सतत होत असलेल्या अशा घटनेमुळे परिसरात भीतीचे वतावरण निर्माण झाले आहे, याअगोदर एका महिन्यांपूर्वी नवेगाव येथील एका शेतकऱ्याचा वाघाने जीव घेतला होता त्यावेळी परिसरातील नागरिक वनविभागा विषयी संतप्त रोष व्यक्त करून वनविभागाला निवेदन देऊन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यावेळी
वनविभागाने पंधरा दिवसांत वाघाचा बंदोबस्त करू अशी आश्वासन दिले मात्र पुन्हा या घटनेत भर पडल्याने शेतीचे संगोपन व रक्षण करणे हे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच विरुर चे ठाणेदार कृष्णकुमार तिवारी, वडतकर व वनविभागा चे अधिकारी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला.
विशेष म्हणजे मागील सहा महिण्यापासून राजुरा व विरूर वन परिक्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत ६ लोकांना नाहक जीव गमवावा लागला आहे. या भागात वाघाने प्रचंड दहशत निर्माण केली असून वन विभागातील कर्मचारीही त्याला जेरबंद करण्याकरिता काचोटीने प्रयन्त करीत आहेत. मात्र सदर वाघ वनकर्मचाऱ्यांच्या तावडीत येत नसून लोकांचा नाहक जीव घेत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आता त्या वाघाला ठार माराच हि मागणी जोर धरू लागली आहे.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.