करोना काळातील २०० युनिटपर्यंत बिल माफ आणि ३०० युनिटपर्यंत ३० टक्के वीज १ ऑक्टोबरपर्यंत स्वस्त न केल्यास सर्व पोलिस ठाण्यांत तक्रार करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पक्षाने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे. वाचा सविस्तर....
नागपूर -
करोना काळातील २०० युनिटपर्यंत बिल माफ आणि ३०० युनिटपर्यंत ३० टक्के वीज १ ऑक्टोबरपर्यंत स्वस्त न केल्यास सर्व पोलिस ठाण्यांत तक्रार करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पक्षाने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला. जिल्हा संयोजक कविता सिंघल व शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघ संयोजकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून वीजबिल माफ करण्याची मागणी केली.
करोनाकाळातील चार महिन्यांचे २०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, वीजदरवाढ मागे घ्यावी, जाहीरनाम्यानुसार ३०० युनिटपर्यंत ३० टक्के सवलत द्यावी, १६ टक्के अधिभार व वहन कर रद्द करावा, वीजकंपन्यांचे कॅगद्वारे ऑडिट करावे, आदी मागण्यांचे पत्र अजय धर्मे, अजय पिसे, लक्ष्मीकांत दांडेकर, आकाश केवले, रोशन डोंगरे, प्रतीक बावनकर यांनी पाठवले. सरकारने विजेच्या प्रश्नावर वारंवार चर्चा केल्या. मात्र, जनतेच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. याबाबत १ ऑक्टोबरपर्यंत सर्व जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांत फसवणुकीची तक्रार करण्यात येईल, असा इशारा 'आप'ने दिला आहे.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.