Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना तालुक्यातील अंतरगाव बु येथे मंगळवार पासून 3 दिवस जनता कर्फ्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - प्रतिनिधी कोरपना - शहराच्या ठिकाणी कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून आता कोरोनाने ग्रामीण भागातीही शिरकाव केला आहे. कोरपना ...

शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -
शहराच्या ठिकाणी कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून आता कोरोनाने ग्रामीण भागातीही शिरकाव केला आहे. कोरपना तालुक्यातील अंतरगाव बु या गावामध्ये कोरोनाने शिरकाव केला असून मागील तीन दिवसात कोरोना पाझिटिव रुग्णाची संख्या 11 वर पोहचली आहे. गावामध्ये कोरोना संसर्ग वाढतच दिसत आहे.

अंतरगाव बु मध्ये सामुहिक संसर्गाची लक्षणे दिसत असल्याने कोरोनाचा अंतरगाव मध्ये केव्हाही उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी ग्राम पंचायत अंतरगाव बु ने 15 सप्टेंबर मंगळवार ते 17 सप्टेंबर गुरुवार पर्यंत जनता जनता कर्फ्यू चे आव्हान केले आहे.

ग्राम पंचायत अंतरगाव बु चे सरपंच सरिता पोडे, ग्राम सचिव प्रशांत टाटेवार, आरोग्य परिचारिका ढवस मॅडम, पोलिस पटिल आनंदराव मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पार पडलेल्या बैठकीत व्यापारी तथा प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहमतीने जनता कर्फ्यू चा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपस्थित अंतरगावचे सरपंच सरिता नितीन पोडे, उपसरपंच श्यामकलाताई पिंपळशेंडे, ग्राम पंचायत सदस्य ग्राम पंचायत सचिव प्रशांत टाटेवर, पोलिस पटिल आनंदराव मडावी, तंटा मुक्ती अध्यक्ष सुरेश कळसकर, आरोग्य परिचारिका ढवस मॅडम, झाडे मैडम,  माजी उपसरपंच आशीष मुसळे, बंडू वडस्कर, बाळा वड्स्कर, बंडू खेलूरकर, गजानन मोरे, प्रतिष्ठित व्यापारी रविकांत गजानन बोबडे, मंगेश वड्स्कर, संतोष पिंपळकर व युथ एजन्सी सर्विस चे अध्यक्ष अमोल कळसकर व त्यांची संपूर्ण टीम उपस्थिती होती. 

तीन दिवस संपूर्ण प्रतिष्ठाने बंद राहतील 
बाहेरगावी जाण्यास व बाहेर गाववरून गावात येण्यास तीन दिवसा करिता मनाई करण्यात आले आहे. अंतरगाव येथील नागरिकांनी या जनता कर्फ्यूला सहकार्य करावे असे आव्हान ग्राम पंचायत प्रशासनाने केले आहे.


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top