Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सोमनाथपूर बाजारातील रपटा व नाली दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
काम न झाल्यास रविंद्र आत्राम यांचा आंदोलनाचा इशारा आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. ०७ ऑक्टोबर २०२५) -         राजुरा शहरातील सोमनाथपूर...
काम न झाल्यास रविंद्र आत्राम यांचा आंदोलनाचा इशारा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ०७ ऑक्टोबर २०२५) -
        राजुरा शहरातील सोमनाथपूर आठवडी बाजार परिसरात तुटलेला रपटा आणि खचलेली नाली नागरिकांच्या डोक्याला ताप ठरत असून, स्थानिकांनी वारंवार तक्रार करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

        दिनांक 5 जुलै 2025 रोजी या समस्येबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने नागरिकांनी राजुरा नगरपरिषदेकडे लेखी निवेदन सादर केले होते. सोमनाथपूर आठवडी बाजारातील मुख्य नाली साप व रपटा तुटल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. याशिवाय नागेश मडावी यांच्या घराजवळील रपटा तुटल्यामुळे रहिवाशांना तसेच वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

        या निवेदनानंतर नगरपरिषदेचे काही कर्मचारी घटनास्थळी जाऊन पाहणी करून गेले. त्यांनी “15 ऑगस्ट झाल्यानंतर 16 वा 17 ऑगस्टला काम सुरू करतो” असे सांगितले होते. मात्र, आता 7 ऑक्टोबर 2025 पर्यंतही कोणतेही काम सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना तुटलेल्या रपट्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, “जर काही जीवितहानी झाली तर जबाबदार कोण?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

        अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे युवा जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र आर.पी. आत्राम यांनी इशारा दिला आहे की, “नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही, तर नागरिकांना घेऊन नगरपरिषदेविरुद्ध आंदोलन छेडण्यात येईल.” स्थानिक नागरिकांनी राजुरा नगरपरिषद चे मुख्य अधिकारी (C.O.) यांना लक्ष घालण्याची आणि तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली आहे.

#RajuraNews #Somnathpur #ChandrapurUpdate #CivicNegligence #PublicSafety #AdivasiParishad #RajuraMunicipalCouncil #CitizenProtest #RoadSafety #VidarbhaNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top