Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: पोलीसांच्या सतर्कतेमुळे २.५ लाखांचे दागिने परत मिळाले!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोलीसांच्या सतर्कतेमुळे २.५ लाखांचे दागिने परत मिळाले! बस स्थानकात दागिने चोरी करणारी महिलांची टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली आमचा विद...
पोलीसांच्या सतर्कतेमुळे २.५ लाखांचे दागिने परत मिळाले!
बस स्थानकात दागिने चोरी करणारी महिलांची टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०४ जून २०२५) -
        मुल बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला मुल पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या टोळीने चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती आणि हैदराबाद या विविध जिल्ह्यांतील बस स्थानक परिसरात अनेक चोरीचे गुन्हे केले होते.

        फिर्यादी महिला दिनांक ६ मे २०२५ रोजी सकाळी १०:४५ वा. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात महिलांनी तिच्या गळ्यातील १० ग्रॅम सोन्याची गोप चोरी केली होती. यावरून पोलीस स्टेशन मुल येथे भा.दं.वि. कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करत असताना, पोलीसांनी बस स्थानक परिसरात गस्त वाढवली व संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले. दिनांक ३० मे रोजी पेट्रोलिंग दरम्यान संशयित दोन महिलांना पकडण्यात आले. त्या अनुक्रमे: सौ. जमुना हितेश उर्फ संदीप नाडे उर्फ वाघमारे (३५ वर्षे) व सौ. लक्ष्मी जगनू मानकर (४० वर्षे) दोघीही रा. रामेश्वरी टोली, नागपूर या महिलांकडे सखोल चौकशी केल्यावर त्यांनी मुल बसस्थानकात ६ व २० मे रोजी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून २५ ग्रॅम वजनाचे, २,५०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन, अप. पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, पोनि अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोरकर, पोहवा भोजराज मुडरे, जमीरखान पठाण, चिमाजी देवकते, नरेश कोडापे, व सिमा निषाद यांनी ही कामगिरी केली. सर्व प्रवाशांनी बसमध्ये चढत-उतरत असताना स्वतःच्या मौल्यवान वस्तू, मोबाईल व दागिन्यांची काळजी घ्यावी. शक्यतो अशा वस्तू प्रवासादरम्यान घालणे टाळावं असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top