Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: कुटुंबातील सदस्यांनी मुलांसमोर मोबाईलचा वापर टाळावा तरच शाश्वत विद्यार्थी घडेल - डॉ. मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कुटुंबातील सदस्यांनी मुलांसमोर मोबाईलचा वापर टाळावा तरच शाश्वत विद्यार्थी घडेल - डॉ. मंगेश गुलवाडे  राणी राजकुंवर प्राथमिक शाळा चंद्रपूर येथ...
कुटुंबातील सदस्यांनी मुलांसमोर मोबाईलचा वापर टाळावा तरच शाश्वत विद्यार्थी घडेल - डॉ. मंगेश गुलवाडे 
राणी राजकुंवर प्राथमिक शाळा चंद्रपूर येथे वार्षिक उत्सव व राणी राजकुंवर भगिनी समाज संस्थेचा वर्धापन दिन साजरा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. १३ डिसेंबर २०२४) -
           राणी राजकुंवर प्राथमिक शाळा, चंद्रपूर येथे दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम (Annual cultural events) व राणी राजकुंवर भगिनी समाज संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अहिल्याबाई होळकर जन्म त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य (Ahilyabai Holkar birth tricentenary year) साधून संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम हा अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित होता. (students) (Rani Rajkunwar Primary School Chandrapur)

        कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मंगेश गुलवाडे (अध्यक्ष, अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी वर्ष समिती, चंद्रपूर तसेच मा.जिल्हाध्यक्ष, भाजपा, चंद्रपूर (Ahilyabai Holkar birth tricentenary year)) होते. प्रमुख वक्त्या म्हणून सौ. अश्विनी सोनवणे (शिक्षणाधिकारी प्रा. वि.चंद्रपूर) या उपस्थित होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित नृत्य-नाटिका, गीत, व नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. प्रमुख पाहुण्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव करत, सामाजिक विकासासाठी त्यांच्या विचारांचा उपयोग करण्याचे आवाहन केले. (Dr. Mangesh Gulwade)

        कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉ. मंगेश गुलवाडे यांनी आपल्या भाषणात आजच्या गतिमान युगात गुणवंत विद्यार्थी (meritorious student) घडविता येतो त्या करिता परिवारातील लोकांनी मुलांसमोर मोबाईल चा वापर  टाळणे म्हणजे शाश्वत विधार्थी घडणे हे ब्रीद पालकांना सांगितले, व विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या हस्त लिखित नवं ऊर्जा या विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या सौ. अश्विनी सोनवणे (शिक्षणाधिकारी प्रा. वि.चंद्रपूर )यांनी आपल्या भाषणात विशेष बाब म्हणून कुटुंबातील एक तरी व्यक्तींनी आपल्या अपत्या सोबत वाचन करावे असे सांगितले. जल्लोष चिमुकल्यांचा या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे निमंत्रण पत्रिका ही विद्यार्थ्यांनी स्वतः हस्तलिखित स्वरूपाची करून मान्यवरांना पाठविली.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक सौ. वैशाली दुर्योधन (Principal Vaishali Duryodhana), राणी राजकुवर भगिनी समाज चंद्रपूरच्या अध्यक्ष सौ. प्राजक्ता भालेकर (प्राजक्ता भालेकर), उपाध्यक्ष माधवी ताई भागवत,सचिव सौ. मुग्धा पाठक, शिक्षकवृंद, पालक आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ.रागिनीताई नंदुरकर व सौ.स्नेहा मिसार यांनी केले तर आभार सौ.सरिता सोनकुसरे यांनी मानले. हा वर्धापन दिन व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम केले.

#students #Annualculturalevents #RaniRajkunwarPrimarySchoolChandrapur #AhilyabaiHolkarbirthtricentenaryyear #DrMangeshGulwade #meritoriousstudent #aamchavidarbha #vidarbha #chandrapur

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top