राजुरा तालुक्यातील विरूर परिसरात एका आठवड्यात दुसरी घटना
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके
विरूर स्टेशन (दि. २३ डिसेंबर २०२४) -
वाघांच्या हल्ल्यामुळे वारंवार घडणाऱ्या दुर्दैवी घटनांमुळे राजुरा तालुक्यातील विरूर परिसर हा नेहमीच चर्चेत असतो मात्र आता आर टी वन नसून सुद्धा पुन्हां वाघाच्या हल्ल्याचे सत्र सुरू झाल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात विरूर परिसरात एका इसमावर वाघाने हल्ला केला होता, तर आता शेतात काम करणाऱ्या वत्सलबाई अर्जुन आत्राम या 60 वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
यात सविस्तर असे की राजुरा तालुक्यातील कविठपेट येथील वत्सलबाई वय 60 वर्ष ही शेतात काम करत असताना काही कामासाठी झोपडीत गेल्या, तेव्हा दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला आणि ओढत नेले. उपस्थित सहकाऱ्यांनी आरडाओरड करून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनांमुळे नागरिकांमध्ये वनविभागाच्या उपाययोजनांबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. लोकांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या घटनांना टाळण्यासाठी वनविभागाने आधीच योग्य पावले उचलली असती, तर या दुर्दैवी घटना घडल्या नसत्या. स्थानिकांनी वनविभागाकडून तत्काळ उपाययोजना आणि वाघांच्या हालचालींवर नियंत्रणासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.
वन्यजीवांशी निगडित अशा घटनांमुळे लोकांच्या जीविताला सतत धोका निर्माण होत आहे, त्यामुळे परिसरातील शेतकरी हे आर टी वन ची पुनरावृत्ती तर नाही ना या अश्या भीती पोटी आपल्याच शेतात दिवसाच शेतात जाणे टाळत असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व विरुर पोलीस घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मात्र बातमी लिही पर्यंत कुठलाही वरिष्ठ अधिकारी हजर झाला नव्हता.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.