कोरपना (दि. ०६ नोव्हेंबर २०२४) -
लोकप्रतिनिधींच्या नाकर्त्येपणामुळे नारंडा गावात अलिकडच्या काळात साथीचे आजार वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मंगळवारी सुंदराबाई उपासे वय ६५ नामक महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिव्या संदीप मोहूर्ले, वैदही गणपत वाडगुरे, लीलाबाई नीकुरे, पूनम लोनबले, आदित्य निकुरे, वैष्णवी परसुटकर यांच्यासह जवळपास २५-३० रुग्ण जिल्ह्याच्या ठिकाणी उपचार घेत असून गावातील परिस्थिती गंभीर आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातील गावात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशाप्रकारचा आजार पसरत असल्याचा आरोप नागरिक लावत आहे.
स्वच्छते अभावी राजुरा विधानसभा क्षेत्रातील गावात गटारांचे पाणी रस्त्यावर वाहत असून सर्वत्र घाण पसरली आहे. तसेच कचरा व्यवस्थापन पण चुकीचे आहे. सर्वत्र अस्वच्छता असल्याने गॅस्ट्रोची लागण झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. गावात पाणी शुद्ध नसल्यामुळे तथा पाण्याचा टाकीची स्वच्छता नियमित होत नागरिकांचा आरोप आहे.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी यासाठी संवर्ग विकास अधिकारी व ग्रामपंचायतीकडे आम्ही लेखी निवेदन दिले आहे. त्वरित रोगप्रतिकारक फवारणी करून व गाव स्वच्छ करून साथीचे रोग नियंत्रणात आणावे अन्यथा नाकर्त्ये लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरुद्ध उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आरोग्य विभागाचा वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. लवकरच साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.- डॉ. स्वप्नील टेंभे, तालुका आरोग्य अधिकारी, कोरपना
#RajuraAssemblyConstituency #Gastro #patient #Naranda #Cleanliness #WasteManagement #BDO #GramPanchayat
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.