Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महाराजांचे आदर्श बाळगणाऱ्या तरुणांचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धोपटाळा ते रायगड धावत जाणाऱ्या युवकांचा केला सन्मान आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ०३ ऑक्टॉबर २०२४) -         हिंदवी स्वराज्यसंस्थापक,...
धोपटाळा ते रायगड धावत जाणाऱ्या युवकांचा केला सन्मान
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०३ ऑक्टॉबर २०२४) -
        हिंदवी स्वराज्यसंस्थापक, क्षत्रियकुलवंतस, सिंहासनाधीश्वर, सकळगुणमंडित, सर्वगुणसंपन्न अशा व्यक्तिमत्त्वाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज. चरित्र आणि चारित्र्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराज! महाराष्ट्र घडवणारा राष्ट्रपुरुष म्हणजे शिवाजी महाराज! 'हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा...' असं म्हणून शिवाजीराजे थांबले नाही; तर त्यांनी ते राज्य मिळवलं, राखलं आणि प्रस्थापित केलं. 'रयतेचा राजा' हा त्यांना तेव्हा, म्हणजे ४००-४५० वर्षांपूर्वी मिळालेला बहुमान आजच्या तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा या उद्दात हेतूने महिलांवरील अत्याचार दूर व्हावेत, समाजात सामाजिक सलोखा राहावा, शेतकरी व शेतमजूर सुखी समृद्ध राहावे, भारताची कीर्ती विश्वात नांदावी असे सामाजिक संदेश घेऊन गुरूदेव चौक गुरुदेव नगर धोपटाळा चा आयुष टेकाम हा युवक धोपटाळा ते रायगड धावत जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर जावून नतमस्तक होणार आहे. त्याच्या सोबत बाईकवर नकुल सुक्रू धुर्वे हा युवक असणार आहे. २ आक्टोंबर गांधी जयंतीच्या दिवशी त्यांनी हि यात्रा सुरु केली असून राजुरा-गडचांदूर मार्गावर पांढरपोवनी गावाजवळ धावत असताना सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी युवकाची भेट घेतली. सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी शाल, श्रीफळ देत त्याला शुभेच्छा दिल्या व त्यांच्या यात्रेचे कौतुक केले. एकीकडे तरुण मुले मोबाईल, बाईक रायडींग, व्यसनाच्या अधीन जात आहे मात्र आयुष टेकाम व नकुल धुर्वे सारखे युवक आगळे वेगळे उपक्रम राबवत तरुणांना नवी दिशा दाखवत आहे, खरंच आपले कार्य कौतुकास्पद असून तरुणांनी यांचा आदर्श घ्यावा असे सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी शुभेच्छा देत सांगितले. 
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #kukudsath #pandharpouni #Raigad #Dhoptala #ShivajiMaharaj #FounderofHinduviSwarajya #AyushTekam #running

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top