Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: शेकडो वर्ष जुन्या वृक्षांची कत्तल ; मानवी प्रगती पर्यावरणावर हावी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रहदारीचा मार्ग सोयीस्कर करण्याकरीता पर्यावरणाचा मार्ग जीवघेणा आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा  (दि.१८ मे २०२४) -         संतुलित पर्यावरणासा...

रहदारीचा मार्ग सोयीस्कर करण्याकरीता पर्यावरणाचा मार्ग जीवघेणा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा  (दि.१८ मे २०२४) -
        संतुलित पर्यावरणासाठी वृक्ष संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने जागतिक वृक्ष दिन, भारतीय वृक्ष दिवस, जागतिक वन्यजीव सप्ताह, जागतिक पर्यावरण दिन, जागतिक तापमान वाढ, वन सप्ताह, जागतिक निसर्ग संवर्धन दिन असे अनेक दिन मोठ्या थाटामाटात आपण जागतिक पातळीवर साजरे करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतो. परंतू मानवी प्रवास सोयीस्कर व्हावा, प्रगतीला गती प्राप्त व्हावी म्हणून मोठं मोठे रस्त्यांचे जाळे विणले जात असताना बामणी-राजुरा-लक्कडकोट-आसिफाबाद या महामार्गाच्या बांधकामाकरीता राजुरा तालुक्यातील जोगापूर-सुमठाना   जंगल परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेकडो वर्ष जुन्या वृक्षांची कत्तल केली जात आहे ही शोकांतीका असून नव्या महामार्गामुळे जुन्या निसर्गरम्य अशा या राजुरा-वरूर रस्त्यावरून वाहतुक करणाऱ्या नागरीकांनी व राजुरा येथील निसर्गप्रेमींंनी हळहळ व्यक्त केली आहे.

        मानवाने प्रदूषणाला आळा घालणे अतिशय आवश्यक अशी बाब आहे परंतु निसर्गतः अप्रत्यक्षपणे वृक्षच अतिशय प्रभावीपणे ते कार्य करू शकतात. संतुलित पर्यावरणासाठी जमीन झाडांच्या छायेत असणे गरजेचे आहे. परंतु मानवी सोयीसुविधेच्या नावाखाली कशाचेही भान न बाळगता वृक्षांची मोठ्याप्रमाणात कत्तल करून महामार्गाच्या कामाला गती देणाऱ्या मानवाने पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे हे जाणून घेतले पाहिजेत तसेच आपला प्रवास सुखाचा करणारे मोठमोठे मार्ग निर्मिती होत असताना हजारो वृक्षतोड करून आयुष्याचा प्रवास मात्र दुःखद होईल याचा विसर  मानवाला पडत आहे. शेकडो वर्षे जुने वृक्ष ही आपली शान आहेत शिवाय निसर्गातील ही हिरवी चादर पर्यावरणाला पूरक आहे. परंतु मानवी प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाची होत असलेली हानी भरून काढणे तितकेच महत्वाचे आहे असे मत बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांनी व्यक्त केले आहे.
- बादल नीलकंठ बेले
  महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था

#aamchavidarbha #vidarbha #maharashtra
#news #breakingnews #chandrapur #rajura
#Treeprotectionandconservation #worldtreeday
#worldwildlifeweek #worldenvironmentday
#Forestweek #worldnatureconservationday
#Bamni-ajura-akkadkotAsifabadHighway
#Slaughterofhundredsofyearsoldtreesforhighways
#naisargikparyavaransanvardhanvmanavatavikassanstha
#badalbele #nature

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top