राजुरा (दि. ५ नोव्हेंबर २०२३) -
जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल करून प्रचंड मेहनत आणि सकारात्मक विचार हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन डॉ. लीना विठ्ठलराव येवले यांनी केले.
धनगर जमात सेवा मंडळ राजुरा यांनी कोजागिरी कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुंडलीक उराडे होते. यावेळी डॉ. लीना यांचा महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच चंद्रपूर जिल्हा शाखेने सत्कार केला त्यावेळी त्यांनी मनोगतातून आपल्या भावना आणि अभ्यास यावर विचार व्यक्त केले. धनगर जमातीचे अनुसूचित जमातीचे घटनात्मक आरक्षण यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुरू आहे यावर प्रबोधन मंच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष कैलास उराडे यांनी सविस्तर माहिती दिली. मुलांचे शिक्षण आणि पालकांची भूमिका यावर शिक्षक नेते संजय चिडे यांनी उद्बोधन केले. अपयश सोडून यशाचा आलेख चढता कसा होईल यात महिलांनी विशेष भूमिका बजावली पाहिजे याकडे केंद्रप्रमुख संध्या ढवळे यांनी लक्ष वेधले. ग्रामसेविका हिंजे मॅडम यांनी धनगरांसाठी असलेल्या शासकीय योजना यावर माहिती दिली. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी अध्यक्ष भाऊराव खाडे, सरोजताई तेलंग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष गोपाळ बुरांडे यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा धवणे यांनी तर सर्वांचे आभार रामकिसन चिडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळू कापडे, ईश्वर बुचे, विठोबा तेलंग, द्रौपदी पोतले,सचिन झाडे, दिनेश पोतले, अनंता गोखरें, प्रणाली तुराळे, वनिता उराडे,बेबी पोतले यांनी परिश्रम घेतले. (rajura) (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.