आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ४ ऑगस्ट २०२३) -
राजुरा तालुक्यात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत चालली आहे. अवैध व्यवसायातून गोळीबार सारख्या घटना घडत आहे. या घटनांमध्ये निष्पाप व्यक्तींचा नाहक बळी जात आहे. त्यामुळे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर तडीपारची कारवाई करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष आदित्य भाके यांनी केली आहे. (Taluka President of Maharashtra Navnirman Sena Aditya Bhake)
शहराला लागून कोळसा खाणी असल्याने परिसरात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. कोळसा तस्करी, डिझेल व किंमती लोखंडी साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारी वाढली आहे. बदला घेण्यासाठी शस्त्रांचा सर्रास वापर केला जात आहे. देशी बनावटीच्या देशी कट्टा तुन गोळीबार करून जीव घेतले जात आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर वेळीच वाचक बसविणे गरजेचे झाले आहे. अशा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना तात्काळ तडीपारची कारवाई करा अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष आदित्य भाके यांनी केली आहे. (rajura) (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.