Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी दहा हजाराची मदत तात्काळ करा भारत राष्ट्र समितीची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी दहा हजाराची मदत तात्काळ करा भारत राष्ट्र समितीची मागणी आमचा विदर्भ -दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि...

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी दहा हजाराची मदत तात्काळ करा
भारत राष्ट्र समितीची मागणी
आमचा विदर्भ -दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २७ जुलै २०२३) -
        राज्यात अतिवृष्टीमुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली, आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. सोबतच अनेक शेतकरी बांधवांचे घर पाण्यामुळे पडले आहे. ह्या दोन्ही अडचणीला माझा शेतकरी बांधव समोर जात आहे.

        शेतकऱ्याला एकरी 10 हजार रुपये, व पडलेल्या घरासाठी कमीत कमी 20 हजार प्रती घर देऊन आलेल्या संकटातून सुटका करावी ही मागणी भारत राष्ट्र समिती राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक आनंदराव अंगलवार, (anandrao angalwar) महिला समन्वयक रेशमा ताई चव्हाण, सहसमन्वयक संतोष कुळमेथे,राजुरा तालुका समन्वयक अजय साकीनाला, तालुका सहसमन्वयक महिला मीनाक्षी मून. राजुरा शहर समन्वयक रवीभाऊ पवार, राजूर तालुका सह समन्वयक सुभाष हजारे ह्यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र व  कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य ह्यांना उप विभागीय अधिकारी ह्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top