Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण व्हावे - माजी नगराध्यक्ष अरुण धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण व्हावे - माजी नगराध्यक्ष अरुण धोटे राजुऱ्यात फडकला १०० फुट उं...
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण व्हावे - माजी नगराध्यक्ष अरुण धोटे
राजुऱ्यात फडकला १०० फुट उंचीचा राष्ट्रध्वज
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर राजुरा येथे १०० फुट उंचीचा राष्ट्रध्वज लागावा, यासाठी स्वातंत्र्याचे ७५ वर्ष १०० फुट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्याचे नियोजन जवळपास वर्षभरापूर्वीच केले होते. यानिमित्याने राष्ट्रध्वजाचा सन्मान व्हावा, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सैनिक यांचे स्मरण व्हावे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले. 
हा राष्ट्रध्वज माय लव्ह माय राजुरा या पाईंट जवळ उभारण्याचे नियोजन होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आता हे ठिकाण नगर परिषद च्या लगतच्या भागात मामा तलावाजवळ ठरविण्यात आले आज मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते राजुरा नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रध्वज फडकविण्यात आले. प्रसंगी शहरवासीयांची मोठय़ा संख्येत उपस्थिती होती. 
माजी नगराध्यक्ष अरुण धोटे पुढे म्हणाले की, स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात आहे. १५ आॅगस्टसाठी लोकांमध्येही उत्साह आहे. मात्र हा उत्साह केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी पूरता मर्यादित न राहता तो कायम राहला पाहिजे. यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहभाग नोंदविला पाहिजे. असे आवाहनही केले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top