Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महात्मा गांधी विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ध्वजारोहण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महात्मा गांधी विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ध्वजारोहण धनराजसिंह शेखावत -  प्रतिनिधी गडचांदूर - भारतीय स्वातंत्र्याच्या...
महात्मा गांधी विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ध्वजारोहण
धनराजसिंह शेखावत -  प्रतिनिधी
गडचांदूर -
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने स्थानिक महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, विज्ञान महाविद्यालय, विद्या मंदिर, स्कॉलर अकॅडमी गडचांदूर येथे 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहेत.
त्या अनुषंगाने 13 ऑगस्ट ला सकाळी शाळेच्या पटांगणात ध्वजारोहण मुख्याध्यापीका तथा प्राचार्या सौ. स्मिताताई चिताडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, प्राचार्य रामकृष्ण पटले, प्राचार्या रश्मी भालेराव, उपप्राचार्य विजय आकनूरवार, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक एच.बी. मस्की होते.
ध्वजारोहण झाल्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत झाले. याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन प्राचार्या स्मिता चिताडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रदीप परसुटकर यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top