एका महिन्यात गावात दुसऱ्या बोरवेलची व्यवस्था
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
गोवरी गावात पाणी टंचाईची भीषण समस्या जाणवत असल्यामुळे सरपंच आशा बबन उरकुडे या एक्शन मोडवर आल्या असून त्यांच्या योग्य नियोजनामुळे मागील एका महिन्यात दोन ठिकाणी बोरवेलची व्यवस्था करण्यात आली आहे. भविष्यात गावात पाण्याची टंचाई होऊ नये याकरिता दूरदृष्टी धोरण ठेवत रपंच आशा बबन उरकुडे यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नातून आज गावचे जेष्ठ नागरिक दशरथ पाटील पाचभाई व विठ्ठल पाचभाई यांच्या हस्ते नारड फोडून बोरवेलचे कार्य करण्यात आले. याप्रसंगी वामन पाचभाई, सुनील पचाभाई, रमेश उताणे व वातली नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.