- अल्ट्राटेक मध्ये पुन्हा कामगार वाद
- नियमित रोजगारासाठी अल्ट्राटेक कंत्राटी कामगारांचे अर्ध नग्न आंदोलन
- मोठ्या संख्येत कामगार आंदोलनात झाले सहभागी
- गडचांदूर चे थानेदार सत्यजित आमले यांची मध्यस्थीने येत्या पंधरा दिवसात कामगारांच्या समस्या लागणार मार्गी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
मागील दोन वर्षापासून अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर येथे विशेषकरून कंत्राटी कामगारांच्या विविध समस्या मागण्या आणि अधिकारांना घेऊन जिल्ह्याचे पालक मंत्री यांच्या कन्या शिवानीताई वाडेट्टीवार यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या विजय क्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडवित असतांना अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये अधिनस्त असलेल्या विविध कंत्राटदारांच्या माध्यमातून कामगारांकरिता रोटेशन पद्धत सुरू करण्यात आली. त्यामुळे कामगारांच्या मिळकतीत निम्म्यापेक्षा जास्त अधिक फरक पडायला लागला. कामगारांची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागली. रोजगाराचे प्रमाण अर्ध्यावर येऊन पोहोचल्याने एक दिवस हाताला काम तर एक दिवस रिकामा यामुळे कामगार मेटाकुटीला आला. सदर समस्येची वाचता वा चर्चा विजय क्रांती कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनी प्रशासनाशी वारंवार केली. मात्र या मधून कोणताही तोडगा न निघाल्याने विजय क्रांती कामगार संघटनेचे पदाधिकारी सुनील ढवस, दशरथ राऊत यांच्या नेतृत्वात अनेक कामगारांना सोबत घेत आज सकाळी आठ ते नऊच्या सुमारास सिमेंट कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. मात्र कंपनी प्रशासनाने आंदोलनाकडे ढुंकूनही न पाहिल्यामुळे दुपारपर्यंत आंदोलन चांगलेच चिघळत राहिले. कंत्राटी कामगारांना वैद्यकीय सोयी सुविधा प्रदान कराव्या, कंपनी कामगारां प्रमाणे इतर सोयी सुविधा द्याव्या, गणवेश द्यावा व सुरू केलेली रोटेशन पद्धत बंद करून महिन्या अंती कामगारांना सव्वीस दिवस रोजगार द्यावा, या मुख्य मागणीला घेऊन आंदोलन सुरू झाले. देशामध्ये महागाईचा भडका उडाला असल्याने पंधरा दिवसाच्या रोजगारामध्ये आम्ही आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाह कसा करायचा ?? शिवाय कंपनीच्या माध्यमातून दिवसागणिक नवीन नवीन कंत्राटदार प्रवेश कंपनीमध्ये होत असल्याने जुन्या कामगारांना याची झड पोहोचत असल्याचे समजते. आता मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री आंदोलनाची दखल घेत काय पाऊल उचलेल याकडे सर्व कामगारांची लक्ष लागलेले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आंदोलनादरम्यान गडचांदूर पोलीस प्रशासनाने योग्य तो चोख बंदोबस्त ठेवलेला असून मध्येच त्यातील भूमिका प्रयत्न पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. यातून काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
कामगारांमध्ये असलेला असंतोष बघता गडचांदूर चे थानेदार सत्यजित आमले यांनी घटनास्थळ गाठून कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन योग्य ती चर्चा घडवून आणली. पुढील पंधरा दिवसात कामगारांना नेहमीच रोजगार मिळेल शिवाय, कामगारांच्या इतर मागण्यांचा सुद्धा प्रामुख्याने विचार करून योग्य त्या पद्धतीने सोडवल्या जाईल असे आश्वासन घेत शेवटी आंदोलनाला पूर्ण विराम देण्यात आला. त्यामुळे सर्व कामगारांनी ठाणेदार सत्यजित आमले चे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.