Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गिलबिली गाव ठरणार विकासाचे मॉडेल मनरेगा अंतर्गत दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा प्रक्रिया सुरू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गिलबिली गाव ठरणार विकासाचे मॉडेल मनरेगा अंतर्गत दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा प्रक्रिया सुरू एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी ...

  • गिलबिली गाव ठरणार विकासाचे मॉडेल मनरेगा अंतर्गत दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा प्रक्रिया सुरू
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
तालुक्यातील गिलबिली ग्रामपंचायतीची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्याकरिता निवड करण्यात आली आहे. या विकास आराखड्यातून गिलबिली ग्रामपंचायत एक विकासाचे मॉडेल ठरणार आहे.याकरिता नरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक व रोजगार सेवकांची चमु मुक्कामी राहून विकास आराखडा तयार करणार आहे.
सदर प्रक्रिया अधिक प्रभावीपणे होण्याकरिता संजय राइंचवार, तहसीलदार बल्लारपूर, किरणकुमार धनवाडे, गट विकास अधिकारी, पं.स. बल्लारपूर यांनी पहिल्या दिवशी सभा घेऊन उपस्थितीर सर्वांना मार्गदर्शन केले.
गिलबिली ग्राम पंचायतीतील आसेगाव, मोहाडी, गिलबिली गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कुटुंबाचा मागणीनुसार योजनेतील अनुदेय 262 कामांपैकी पाहिजे त्या वैयक्तिक कामांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यानंतर तिन्ही गावाचे शिवार फेरी, गाव फेरी काढण्यात येणार आहे. त्याद्वारे सार्वजनिक जलसंधारण कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच वन विभाग व वैयक्तिक जमिनीवर वृक्ष लागवड, तलावातील गाढ काढणे, बोडी खोलीकरण, मजगी, शेततळे या कामांचा समावेश करण्यात येणार आहे. गावकऱ्यांचा माध्यमातून सिमेंट रस्ते, सामूहिक शोषखड्डे, नॅडेप टाके बांधकाम, गुरांचा गोठा, सार्वजनिक गोडाऊन, बचत गटांच्या महिला करिता इमारत तसेच शाळा अंगणवाडी करिता भौतिक विकासाची कामे मोठ्या प्रमाणात नियोजनात घेण्यात येणार आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top