Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मोहफुलांपासून मिळतोय रोजगार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मोहफुलांपासून मिळतोय रोजगार हंगाम : फुले गोळा करण्यासाठी कष्टकऱ्यांची लगबग आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स देवलापार - वसंताची चाहूल लगताच रान...

  • मोहफुलांपासून मिळतोय रोजगार
  • हंगाम : फुले गोळा करण्यासाठी कष्टकऱ्यांची लगबग
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
देवलापार -
वसंताची चाहूल लगताच रानोवनी मोहवृक्षांना बहर आला असून जंलगव्याप्त भागातील नागरिकांसाठी मोहाचा हंगाम सुरू झाला आहे. अतिशय पौष्टिक असलेली ही फुले गोळा करण्यासाठी शेतशिवारात, जंगलात नागरिकांची लगबग दिसून येत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी, मजूरवर्ग रोजगाराच्या दृष्टीने मोहफुलांकडे बघतो. मोह हे ग्रामीण भागांतील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. आदिवासी समाजबांधव मोहाला केवळ कल्वक्षच नव्हे तर देव मानतात. ग्रामीण भागातील जीवन व त्यांचे सण, धार्मिक कार्यक्रम या झाडाशिवाय पूर्ण होत नाही. त्यांच्या प्रत्येक पूजेसाठी मोहफुले अनिवार्य असतात. मोहफुलांच्या गळतीचा हंगाम आला की, ही फुले गोळा केली जातात. रोख पैशांची गरज असेल तेव्हा बाजारात विकतात. सध्या मोहवृक्ष फुलांनी बहरले आहेत. या मोहफुलांच्या संकलनातून जंगलागतच्या ग्रामीण नागरिकांना हंगामी रोजगार उपलब्ध होत आहे. तथापी मोह हा बहुपयोगी वृक्ष असल्याने त्याला झाडीपट्टीतील नागरिकही कल्पवृक्ष म्हणतात. मोहफुलांपासून सरबत, जॅम, जेली, लाडू पुरणपोळी असे अनेक पदार्थ तयार होतात.
मोहफुलाच्या बियांना टोर किंवा टोळंबी म्हणतात. या बियांचे तेल खाद्यतेल म्हणून वापरले जातात. शिवाय त्वचाविकारावरही ते गुणकारी आहे. मोहफुल हे सध्या बहरत आहे. एका झाडापासून रोज अंदाजे 20 ते 30 किलो मोहफुले मिळतात. ही फुले वाळविल्यानंतर साधारणतः 30 ते 35 रूपये प्रतिकिलो दराने विकली जातात. मोहाचे फल पौष्टिक असल्यासने गर्भवती स्त्री, आजारी व्यक्तींना खायला देतात. खरेतर मोहवृक्षाचा प्रत्येक भाग उपयोगाचा आहे. त्याच्या पानांच्या अतिशय मुलायम पत्रावळी तयार होतात. लाकडापासून फर्निचर तयार होते. फुलांपासून विविध पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करतात. याची साल व मुळांचाही औषधी उपयोग होतो. त्यामुळे या वृक्षांचे संवर्धनही तेवढेच महत्वाचे आहे.

मोहफुल दारूसाठी बदनाम
मोहवृक्ष सर्वांगाने गुणकारी आणि उपयोगी असला, तरी याच्या फुलांपासून दारू निर्माण होत असल्याने हा बहुमोल वृक्ष नाहक बदनाम झाला आहे. खरेतर द्राक्ष, ऊस, काजूगर अशा अनेक फळांपासून तसेच बाजरी, ज्वारी आदी कडधान्ये व तांदळापासूनही मद्य तयार होते. पण, दारू म्हटले की, केवळ मोहवृक्षाचेच नाव घेण्यात येते. त्यामुळे याबद्दलही जनजागृती आवश्यक आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top