Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी वाहिली आदरांजली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी वाहिली आदरांजली शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - थोर समाज सु...

  • क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी वाहिली आदरांजली
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त आजाद बाग येथे आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगवार यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी केंद्रिय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, नगर सेवक नंदु नागरकर, विजय राऊत, कुणाल चहारे, सुर्या अडबाले, डि. के आरिकर यांच्या सह सर्व पक्षीय पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आजाद बागेत आयोजित अभिवादन कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहत क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करित अभिवादन केले.
थोर क्रांतिकारी विचारवंत ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात सुधारणेची पुरोगामी परंपरा सुरू केली. वर्तमानात आपल्या सभोवताली समाजात आढळणार्या उणिवा, दोष, त्रुटी पाहून भविष्यात त्यावर मात करण्यासाठी मार्ग शोधून अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध आयुष्यभर ते झगडत राहिले, त्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. हजारो अनुयायी घडवले. विदया, सत्य आणि सत्शील यांचाच सदैव आग्रह धरत समाजाला सत्य आणि समता या तत्त्वांचा सक्रिय संदेश दिला त्यांचा हा संदेश अंगिकारण्याची गरज असल्याची भावणा आदरांजली कार्यक्रमा प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top