विरेद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
चनाखा येथील शेतकरी रामराव वडस्कर यांच्या बैलाचा शेतामध्ये चारा खात असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकारी यांना या बाबत माहिती देण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांनी बैलाची तपासणी करून बैलाला मृत घोषित केले. रामराव वडस्कर हे अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्या कडे पूरक भांडवल नाही आणि शेती अतिरिक्त त्यांच्याकडे कुठलाही पूरक व्यवसाय नाही. अश्यातच बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले असून या समोर शेतीची कामे कशी करायची असा प्रश्न त्यांचा समोर उभा झाला आहे. सदर शेतकऱ्यास बैल घेण्याकरिता ५० हजाराची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुशिल मडावी यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.