Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बांबूमध्ये जिल्हाचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता - जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जागतिक बांबू दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - गरिबांचा लाकूड समजल्या जाणारा बांबू अन्न, औषध, इमा...
  • जागतिक बांबू दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
गरिबांचा लाकूड समजल्या जाणारा बांबू अन्न, औषध, इमारत बांधकाम साहित्याचा पर्याय, हस्तव्यवसाय, फर्निचर, कृषी, निसर्ग पर्यटन, कागद निर्मिती प्रकल्प आदि क्षेत्रात मोठा बदल घडवून आणू शकतो. बांबूपासून तयार करण्यात येणा-या शोभेच्या वस्तूंची बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीचे बांबू सक्षम साधन असून बांबूमध्ये जिल्हाचे अर्थकारण बदलविण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर आणि बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांच्या वतीने चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधनी येथे जागतीक बांबू दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनरक्षक एन. आर. प्रविण यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर, उप वनरक्षक अरविंद मुंढे, दिपेंद्र मल्होत्रा, जी. गुरुप्रसाद, नंदकिशोर काळे, बांबू संशोधन केंद्राचे संचालक के.एम. अभर्णा, किशोर कोने आदि. मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थिती होती.
   माध्यमातून पोहविण्याची गरज आहे. चंद्रपूरातील जमीनही बांबू उत्पादनासाठी उपयुक्त आहे. त्यामूळे बांबुचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येईल या दिशेने वन विभागाने प्रयत्न करावेत. बांबू पासून तयार होणा-या वस्तुंच्या विक्रीकरीता बाजारपेठ उपलब्ध करावी, बांबू हा इतर झाडांपेक्षा ३५ टक्के अधिक  ऑक्सिजन सोडते तर प्रति हेक्टर १२ टन कार्बन डाय ऑक्साईट वातावरणातून काढू शकते. ऊर्जा निर्मिती करिताही बांबूचा वापर केला जातो. बांबूवर आधारीत पारंपारीक व आधूनिक उद्योग निर्मिती करणा-या उदयोजकांना सवलत देण्यात यावी, शेतक-यांना मोठ्या प्रमाणात बांबू रोपट्याचा पूरवठा करण्यात यावा असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. बाबू लागवडीला चालणा मिळावी या करीता अटल बांबू समृध्दी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतक-यांना मिळावा याकरिता संबंधित विभागाने अधिक परिश्रम घेण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. बांबूबाबत जागरुकता वाढावी याकरिता दरवर्षी जागतीक बांबू दिन मोठ्या प्रमाणात साजरा करावा असे आवाहणही त्यांनी यावेळी बोलतांना केले. या कार्यक्रमात बांबू लागवड करणा-या शेतक-यांचा सत्कार  करण्यात आला.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top