चंद्रपूर -
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त समृद्धी नगर येथील भाजपा जिल्हा सचिव चंद्रपूर महानगर राजेश येलय्या कोमल्ला यांच्या अध्यक्षतेखाली राजन्ना राजम भंडारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी राजेश कोमल्ला म्हणाले की, जोपर्यंत देशातील प्रत्येक नागरिक राजकारणात रस घेणार नाही, तोपर्यंत आमचा नागरी सेवक, आमदार, खासदार आणि पंतप्रधान कोण व्हावे? ते का असावे जोपर्यंत आपण त्यावर विचारमंथन करत नाही तोपर्यंत आपण योग्य विकास आणि सुशासन मिळवण्यापासून वंचित राहू. राजेश कोमल्ला यांनी सर्व नागरिकांना राजकारणात रस घेण्याचे आणि राजकारणाविषयी माहिती ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपचे तेलुगु समाज शहर अध्यक्ष सूरज सरदम, शैलेश दिंडेवार, दींडेवार, अर्जुन भंडारी, तिरुपति पेरम, सिनु आरूटला, शंकर बोलम, चंदू ओदेवार, विशाखा राजुरकर, रवि झाडे, सिनु अंबरकोंडा, रामचंद्र गोलेवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता समृद्ध युवा बहुद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी राकेश ठाकुर, क्रिष्णा माहुरकर, प्रवीण मद्दीवार, राजेश ठाकुर, अक्षय ईदावार, क्रिष्णा मडे, संपत मडे, मोजेश झाडी इत्यादींनी परिश्रम घेतले.











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.