- युवा नेते स्वप्नील वरारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- इरई (बोरगाव) येथे नागरिकांसोबत बैठक संपन्न
गडचांदूर -
गावातील नागरीक हा प्रत्येक गावातील विकासाचा कणा असतो, आपल्या गावातील विकास साध्य करण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे, शासनाची प्रत्येक योजना हे समाजातील अंतिम घटकांपर्यत पोहचली पाहिजे, प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हा आपल्या आपल्या नुसार आपले कर्तव्य बजावत असतो, परंतु आपल्या ग्रामविकासाकरिता आपल्या प्रत्येक नागरिकांनी झटले पाहिजे असे प्रतिपादन कोरपना तालुक्यातील इरई बोरगाव येथे गावातील नागरिकांशी संवाद साधताना भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केले. यावेळी गावातील युवा नेते स्वप्नील वरारकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी सरपंच बंडू गेडाम, राजू वरारकर, मंगेश मोहूरले, स्वप्नील वरारकर, विजेता गेडाम, निखिल पिदूरकर उपस्थिती होते.
यावेळी गावातील नागरिकांना संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, जिल्हा परिषदेच्या योजना, गावातील विकासाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या भोयगाव ते गडचांदूर रस्त्याची माहिती नागरिकांना देण्यात आली.
तसेच तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, सरकारी रुग्णालय, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी येथे कोणत्याही प्रकारची अडचण नागरिकांना असल्यास आम्ही निश्चितच मदत करू असे आश्वासन यावेळी आशिष ताजने यांनी गावातील नागरिकांना दिले.










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.