राजुरा -
'स्वच्छ भारत...स्वच्छ शहर' चा नारा देत आपले शहर, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊन शहर, गाव स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, येरगव्हान गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छते कडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती अन शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात कोरोनाच्या फैलावाला रोखता रोखता दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे. गावातील संपूर्ण नाल्या, गटारी भरून असून काही ठिकाणी नाल्यांच्या वरती पाणी निघून जात आहे. त्यामुळे गावातील नागरिक त्रस्त असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी सरपंच व ग्रामसेवक कडे वारंवार तक्रार, व कोरोना काढात पत्रव्यवहार करून सुद्धा याकडे ग्रामपंचायत चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
असल्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या स्वस्ताला धोका नाकारता येत नाही. येरगव्हान येथे वारंवार अस्वच्छते कडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण होत आहे. तात्काळ नाले सफाई व नाले दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली असून यावर तात्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा येरगव्हान वासियांकडून देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.