Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पर्यटकांना 'भुरळ' घालणारा सहस्त्रकुंड धबधब्याचे रौद्ररूप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - महाराष्ट्रातील आकर्षक, मनमोहक धबधब्याच्या शृंखलेतील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा हा पर्यटक...


रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
महाराष्ट्रातील आकर्षक, मनमोहक धबधब्याच्या शृंखलेतील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा हा पर्यटकांच्या व निसर्गप्रेमींना 'भुरळ' घालणारा आहे.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर हा धबधबा असून विदर्भातील यवतमाळ व मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात याचा समावेश होतो. हा आकर्षक धबधबा यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड व नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर, किनवट तालुक्यात आहे. पैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रात एका ठिकाणी असलेल्या खडकात निर्माण झालेल्या भल्या मोठ्या दरीमुळे हा धबधबा निर्माण झाला आहे. पौराणिक कथेनुसार भगवान परशुराम यांनी क्रोधीत होऊन येथे त्यांचे 'परश'(फरश) हे शस्त्र आपटले होते आणी त्यातून येथे नदीपात्रात खोल दरी निर्माण झाली. ते काहीही असो आज मात्र वर्षानुवर्ष येथे हा धबधबा पहाण्यासाठी राज्य व देशभरातून लाखो पर्यटक येतात. हा धबधबा हा अत्यंत धोकादायक देखील आहे त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन सुरक्षित अंतरावरून तो पहावा. धबधबा ज्या दरीत आदळतो त्या दरीची खोली अजूनही किती आहे याचा अंदाज लागलेला नाही. हा धबधबा व परिसरातील दाट वनराई चा आनंद पर्यटकांनी एकदातरी नक्की अनुभवावा असा आहे. नांदेड या जिल्ह्याच्या ठिकाणावरून १३५ किलोमीटरवर तर यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणावरून १८५ किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. उमरखेड वरून ७०,किनवट वरून ३० तर हिमायतनगर वरून २५ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. धबधब्याच्या तिरावर पौराणिक पंचमुखी महादेव मंदिर आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top