Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अनिल देशमुख प्रकरण : नागपुरात ईडीचे तीन ठिकाणी छापे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागपुरात तीन ठिकाणी छापे टाकले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणाशी संबंधित हे छापे असल्याची माहिती आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नाग...

  • नागपुरात तीन ठिकाणी छापे टाकले
  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणाशी संबंधित हे छापे असल्याची माहिती
आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) बुधवारी नागपुरात तीन ठिकाणी छापे टाकले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणाशी संबंधित हे छापे असल्याची माहिती आहे.

बुधवारी सकाळी मुंबईहून ईडीचे पथक नागपुरात पोहोचले. स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने पथकाने एकाच वेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापे टाकले. वृत्त लिहिपर्यंत ही कारवाई सुरूच होती. ईडीच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या छाप्यांमुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

१०० कोटींच्या मागणीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कोलकाता येथे दोन बनावट कंपन्यांचे दस्तऐवज सीबीआयला आढळले. या बनावट कंपन्यांद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. ते देशमुखांशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आला. सीबीआयने ईडीला याबाबत माहिती दिली. ईडीनेही गुन्हा दाखल करीत प्रकरणाचा तपास सुरू केला. गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीच्या तीन पथकांनी २५ मे रोजी अंबाझरीतील शिवाजीनगर येथील हरे कृष्ण अपार्टमेंटमधील सागर भटेवारा, सदरमधील न्यू कॉलनी येथील समीत आयझॅक आणि गिट्टीखदानमधील जाफरनगर येथील कादरी बंधू यांच्याकडे छापे टाकले. तब्बल पाच तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिघांच्या निवासस्थानांची झाडाझडती घेतली होती. तिघेही देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचे मित्र आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top