Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: व्यापारी, दुकानदार, फेरीवाले, भाजी विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
२० मे पर्यंत कोरोना चाचणी करून घेणे गरजेचे ; अन्यथा व्यवसाय करता येणार नाही नियमांची कडक अंमलबजावणी सध्या हाच मुख्य तोडगा.... अनिल गंपावार -...

  • २० मे पर्यंत कोरोना चाचणी करून घेणे गरजेचे ; अन्यथा व्यवसाय करता येणार नाही
  • नियमांची कडक अंमलबजावणी सध्या हाच मुख्य तोडगा....

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
कोरोनाच्या पादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने व्यापारी, दुकानदार, फेरीवाले, भाजी विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. पहिल्या टप्यात फेरीवाले, भाजीपाला, फळ, दूध, चिकन - मटण इत्यादी विक्रेते, दुसऱ्या टप्प्यात मेडिकल, किराणा दुकानदार व त्यांचे अधिनस्थ सहकारी कर्मचाऱ्यांना RTPCR चाचणी करून कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. २० मे पर्यंत कोरोना चाचणी करून घेणे गरजेचे असून त्यानंतर जेव्हापर्यंत RTPCR चाचणी करून कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सोबत राहणार नाही तोपर्यंत व्यावसायिकांनी व्यवसाय करण्याचे टाळावे असेही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. RTPCR टेस्ट नसलेल्या व्यापाऱ्यांच्या आस्थापना बंद करण्यात येईल असेही प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. 

"नागरिकांचे आरोग्य त्यांच्याच हाती"
शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी घ्यावी लागेल, सर्व व्यापाऱ्यांनी चाचणी करून घ्यावी, हे आपल्या, कुटुंबियांच्या व आपल्या ग्राहकांच्या हिताचे ठरेल तरी वर नमूद केलेल्या सर्व व्यावसायिकांनी चाचणी करून घ्यावी व सुरक्षित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top