Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शेतकरी आर्थिक संकटात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ब्रेक द चैन मुळे बॅंकेच्या कामकाजावर मर्यादा पीक कर्ज वाटप ठप्प रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ (नेर) - ब्रेक द चैन मुळे बँकेत कर...

  • ब्रेक द चैन मुळे बॅंकेच्या कामकाजावर मर्यादा
  • पीक कर्ज वाटप ठप्प
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ (नेर) -
ब्रेक द चैन मुळे बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने गेल्या महिनाभरापासून पीक कर्ज वाटप प्रक्रिया ठप्प आहे. करोनामुळे इतर कामकाज ही संथ गतीने सुरू आहे. परिणामी, ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहे.

शेतीचा पतपुरवठा झाला नाही तर शेतकऱ्यांपुढे अत्यंत गंभीर अस आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. अवघ्या काही दिवसांवर पेरणी आली आहे. पेरणी कशी करायची? पेरणी साठी लागणार खत, बियाणे कसे विकत घ्यायचे? पैसे आणायचे तरी कुठुन? हा प्रश्न शेतऱ्यांसमोर उभा झाला आहे ? खरतर देशावर कोरोना च संकट आहेच परंतु शेतकर्यांचा प्रश्न मागे ठेऊन चालणार नाही. कारण पिकच उगवल नाही तर खाणार काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर पीक कर्ज वाटप सूरू करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून सरकार कडे केली जात आहे. पीक कर्जाच्या प्रतिक्षेत शेतकरी वर्ग असून लवकरात लवकर पाऊल उचलण्याची मागणी सुद्धा होत आहे.  


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top